रत्नागिरी ः पोलिस व्हेरिफिकेशन न करता 8 खलाशांना स्वतःच्या 2 बोटींवर ठेवून पोलिसांच्या लेखी आदेशाची अवज्ञा केल्याप्रकरणी बोट मालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वा.सुमारास मिरकरवाडा जेटी समोरील समुद्राच्या पाण्यात एक नॉटिकल मैल अंतरावर करण्यात आली.
अजगर अब्दुल लतीफ कोतवडेकर (रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बोट मालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस काँस्टेबल अभिजित गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शहर पोलिसांकडून 30 नोव्हेंबर 2025 रोजी मिरकरवाडा जेटी व अन्य जेटीच्या ठिकाणी असलेल्या मच्छिमार बोट मालकांना त्यांच्या बोटीवर असलेल्या परराज्यातील व परदेशातील खलाशांचे पोलिस व्हेरिफिकेशन करुन घेण्याबाबत व तसे न केल्यास बोट मालकांना जबाबदार धरुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचा आदेश देण्यात आला होता. त्याप्रमाणे बोट मालकांकडून कार्यवाही होणे अपेक्षित होते. असे असतानाही संशयित अजगर कोतवडेकरने या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आली.