राजापूर ; पुढारी वृत्तसेवा शहर बाजारपेठेत विजेच्या तीव्र धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या संतोष रामचंद्र वरक (वय 28) रा. नाणार (मयेकर मांगर) या महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. आज (मंगळवार) सकाळी 10.30 ते 11.00 वाजण्याच्या दरम्यान ही दुदैवी घटना घडली आहे.
भर बाजारपेठेत घडलेल्या या अपघातात एका तरूण कर्मचाऱ्याचा दुदैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या अपघाती मृत्यूची माहिती कळताच महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शहरातील नागरिकांनी राजापूर ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली.
सकाळी शहर बाजारपेठेत काम करीत असताना वरक याला वीजेचा धक्का बसून तो कोसळला. यात तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला अधिक उपचारासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या दरम्यान त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.
हेही वाचा :