अहमदनगर

पळवून नेलेल्या मुलीचा तपास लावावा ; हताश पित्याची मागणी

अमृता चौगुले

टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा :  एक महिन्याचा कालावधी उलटूनही अल्यवयीन मुलीचा तपास लावण्यात आला नसून या घटनेचा लवकरात लवकर तपास लावावा व माझी मुलीचा शोध लावून आरोपीस अटक करुन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी टाकळीभान येथील एका पित्याने जिल्हा पोलिस अधिक्षक अहमदनगर यांचेे कडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमुद केले आहे की, मी टाकळीभान (ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) येथील रहिवासी असून दिनांक 3 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास मी आमच्या शेळ्या चारण्यासाठी भोकर शिवारात गेलो होतो. तसेच आमचे गावाचा बाजार असल्याने पत्नी दुपारच्या सुमारास बाजार करण्यासाठी गेली होती. त्यावेळी मुलगी घरी एकटी होती. त्यानंतर संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमारास मी शेळ्या घेऊन व पत्नी बाजार घेऊन घरी आलो असता त्यावेळी मुलगी ही घरात दिसली नाही. त्यानंतर बराच वेळ झाला तरी मुलगी घरी न आल्याने आम्ही तिचा नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही.

तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी आमिष दाखवून अज्ञात कारणासाठी फुस लावून माझे घरून पळवून नेले आहे. तशी फिर्याद मी श्रीरामपुर तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. घटना घडून एक महिन्याचा कालावधी उलटूनही पोलिसांकडून अद्याप पर्यंत मुलीचा व तीला फुस लावून पळवून नेणार्‍यांचा तपास लागलेला नाही. माझी मुलगी इयत्ता 12 वी मध्ये शिकत होती व तिचे वय 17 वर्षे असून ती अल्पवयीन आहे. त्यामुळे तिला चांगले बरेवाईट कळत नाही. त्यामुळे या घटनेचा तपास तातडीने लावावा म्हणून मी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात वेळोवेळी जाऊन मुलीच्या शोधाबाबत विचारले असता समाधानकारक उत्तरे मिळत नाही. याच गावातील एक मुलगाही त्या दिवसापासून बेपत्ता आहे. याबाबत पोलिसांना देखील मी वेळोवेळी माहिती दिलेली आहे. माझी मुलीचे जिवाचे काही बरेवाईट केले असल्याबाबत मला त्यांचेवर संशय आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT