अहमदनगर

नगर : धोकादायक विजेचा खांब हलविण्याची मागणी

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी-नगर रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहासमोर विजेचा खांब रस्त्यावर झुकला आहे. त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. नगरी परिषद प्रशासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून हा खांब सरळ करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. रस्त्याच्या मध्यभागी नगरपरिषदेकडून पथदिवे लावले आहेत. या पथदिव्याला चारचाकी वाहनाने धडक घेऊन याची मोडतोड केली. त्यामुळे हा खांब रस्त्याच्या बाजूला झुकला आहे.या रस्त्यावरून महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच शाळेतील लहान-मोठी मुले सायकलवर व पायी ये-जा करीत असतात.

कल्याण- निर्मल राष्ट्रीय मार्ग पाथर्डी शहरातून जातो, चोवीस तास या रस्त्यावरून रहदारी सुरू असते. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अनेकदा पथदिव्यांमध्ये वद्युत प्रवाह उतरल्याने जनावरांचा चिटकून मृत्यू झाला आहे. कोरडगाव, चिंचपूर ा रस्त्यावरील पथदिवे नव्याने बसविले आहेत. तेथील जुने पथदिवे नगरपरिषदेने कापले आहेत. त्या कापलेला खांबाचा भाग जमिनीवर आल्याने अपघात होऊ शकतो.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT