अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील गेल्या दीड महिन्यांत सरासरी फक्त 105.4 मिलिमीटर पाऊस झाला आहे. जवळपास 36 टक्के पाऊस कमी झाला आहे. बुधवारी पाऊस झालाच नाही. दमदार पावसाअभावी अडीच लाख क्षेत्र पेरणीविना पडून आहे. पेरणी झालेल्या साडेतीन हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी दमदार पावसाची अपेक्षा आहे. 1 जून ते 17 जुलैदरम्यान 164.8 मिलीमीटर पाऊस अपेक्षित आहे.
मात्र, जवळपास 60 मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे. दमदार पावसाअभावी खरीप पेरणी रखडली आहे. राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर व पारनेर या तालुक्यांत अद्याप 50 टक्के देखील पाऊस झालेला नाही. येत्या काही दिवसांत दमदार पावसाने हजेरी न लावल्यास खरीप पेरणी वाया जाण्याची भीती बळावली आहे. मात्र, अकोले तालुक्यात दोन तीन पाऊस दमदार झाले आहेत. त्यामुळे मुळा, भंडारदरा व निळवंडे या धरणांत काही प्रमाणात पाण्याची आवक झालेली आहे.
हेही वाचा