महाकाल मंदिर व्यवस्थापन समितीकडून लाडू प्रसाद तयार केला जात आहे. 
Latest

उज्जैनच्या महाकाल मंदिरातून प्रसादाचे ५ लाख लाडू अयोध्‍येला पाठवले जाणार!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अयोध्‍येतील राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठापणा सोहळ्यासाठी देशभरात अभूतपूर्व उत्‍साहाचे वातावरण आहे. देशातील विविध राज्‍य आणि तीर्थक्षेत्रांमधून अयोध्‍येला प्रसाद आणि धान्‍य पाठवणे सुरु आहे. २२ जानेवारी रोजी होणार्‍या प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यासाठी जनतेमध्‍ये प्रचंड उत्‍साहाचे वातावरण आहे. या सोहळ्यासाठी उज्जैनच्या महाकाल मंदिरातील लाडू प्रसाद अयोध्येला पाठवला जाणार आहे. त्यासाठीची तयारी जोरात सुरू आहे. (Lord Mahakal Laddu will go to Ayodhya during Pran Pratishtha)

उज्जैनच्या महाकाल मंदिरातीलप्रसादासाठी लाडू बनवणाऱ्या कारागिरांची संख्याही वाढली असून, मंगळवार, १६ जानेवारीपासून हे लाडू ट्रकने अयोध्येला पाठवले जाणार आहेत. श्री राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात महाकाल मंदिरातून ५ लाख लाडू प्रसाद पाठवण्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी घेतला आहे. महाकाल मंदिर व्यवस्थापन समितीकडून लाडू प्रसाद तयार केला जात आहे. ( Lord Mahakal Laddu will go to Ayodhya during Pran Pratishtha )

महाकाल मंदिराचे सहाय्यक प्रशासक मूलचंद जुनवाल यांनी सांगितले की, ५ लाख लाडूंसाठी ५ लाख पाकिटे बनवली जात असून यापूर्वी 80 कारागीर लाडू बनवत होते, मात्र वेळ लक्षात घेऊन आणखी 20 कारागिरांची वाढ करण्यात आली आहे.आता दररोज 100 कारागीर लाडू बनवण्यात गुंतले आहेत. १६ जानेवारीपर्यंत लाडू तयार केले जातील. त्यानंतर हे लाडू 2 ते 3 ट्रकमध्ये पाठवले जाण्याची शक्यता आहे.

लाडूंचे वजन ५० क्विंटल

पाच लाख लाडूंचे वजन सुमारे 250 क्विंटल असेल, असे मानले जात आहे. यासोबतच ५० क्विंटल लाडू स्वतंत्रपणे बनवले जाणार आहेत. विशेषत: भाविकांसाठी करण्यात येत असलेल्या लाडू प्रसादाची तयारी पाहण्यासाठी जिल्हाधिकारी नीरजकुमार सिंह यांच्यासह मंदिराचे प्रशासक संदीप सोनी यांनी लाडू युनिटमध्ये पोहोचून तयारीची माहिती घेतली.

सुमारे एक कोटी रुपये खर्च

महाकाल मंदिराचे प्रशासक संदीप सोनी यांनी माध्‍यमांशी बोलताना माहिती दिली की, प्रत्येक लाडू 50 ग्रॅमचा बनवला जात आहे. हे प्रत्येक लाडूच्या बॉक्समध्ये बनवले जातील, 10 किलोच्या मोठ्या बॉक्समध्ये पॅक केले जातील आणि 21 जानेवारीपर्यंत ट्रकमध्ये अयोध्येला पाठवले जातील.

८० क्विंटल तूप… ९० क्विंटल साखर

५ लाख लाडू बनवण्यासाठी आणि पॅक करण्यासाठी सुमारे ८० क्विंटल शुद्ध तूप, ९० क्विंटल साखर, ७० क्विंटल हरभरा डाळ, १ टन काजू, ५ क्विंटल बेदाणे आणि १ क्विंटल वेलची लागेल. महाकाल मंदिरातील लाडूंना भारत सरकारच्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) या संस्थेने स्वच्छतेसाठी पंचतारांकित रेटिंग दिले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT