मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क : बहुमत नसेल तर मविआने योग्य निर्णय घ्यावा, असा सल्ला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीला दिला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यपालांनी राज्य सरकारच्या निर्णयाची माहिती घेणं योग्यचं आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. फडणवीसांसोबत केलेल्या चर्चेची माहिती नाही. मविआने आत्मचिंतन करावं. जेवढी गरज तेवढ्या वेळासाठी भाजपची वेट अँड वॉचची भूमिका असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.