Latest

गडचिरोली : मुसळधार पावसाचा हाहाकार ; ट्रक वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू

मोहन कारंडे

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. अशाच प्रकारे अहेरी तालुक्यातील पेरमिली नाल्यावरून शनिवारी रात्री ट्रक वाहून गेल्याची घटना घडली. ट्रकमध्ये सुमारे ६ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असुन या दुर्घटनेतील तीघांचे मृतदेह सापडले आहेत. प्रशासनाकडून पहाटेपासून शोधमोहीम सुरू आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT