पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आणखी एका विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. अहमदाबद झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात विराटने १८६ धावांची खेळी केली. त्याने तब्बल तीन वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचे प्रदर्शन केले. चौथ्या कसोटी सामन्यात विराट प्लेअर ऑफ द मॅच (सामनावीर) ठरला. या कामगिरीमुळे विराटच्या नावावर आणखी एक विश्वविक्रम नोंदला गेला आहे. ( Virat kohli record )
विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमध्ये फ्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार मिळविण्याची ही दहावी वेळ आहे. वन-डेमध्ये त्याने ३८ वेळा तर टी-२० मध्ये त्याने १५ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरर्मेटमध्ये १० किंवा त्याहून अधिक वेळा फ्लेअर आीफ दम मॅच (सामनावीर) पुरस्कार त्याने पटकावला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे. त्याच्याकडे एकूण ६३ सामनावीर पुरस्कार आहेत. ( Virat kohli record )
हेही वाचा :