पुढारी ऑनलाइन डेस्क : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त सुकमा येथे नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा घृणास्पद कृत्य केले आहे. नक्षलवाद्यांनी दोन गावकऱ्यांची हत्या केली आहे. सोडी हुंगा आणि माडवी नंदा अशी मृत गावकऱ्यांची नावे आहेत. या हत्येची जबाबदारी नक्षलवाद्यांच्या पामड एरिया कमिटीने घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर गावकऱ्यांच्या मृत्यूसाठी नक्षलवाद्यांनी भाजप सरकारला जबाबदार धरले आहे. Naxalite Attack In Sukma
हेही वाचा