पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरातील टोमॅटो उत्पादन भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे देशभरातच टोमॅटोच्या किंमती आव्वाच्या सव्वा झाल्या होत्या. टोमॅटो दरवाढीमुळे मोठमोठ्या हॉटेलसह सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातही टोमॅटो दिसेनासा झाला होता. मात्र बाजारात सध्या आणि इथून पुढे टोमॅटोची आयात काही प्रमाण होणार असून, टोमॅटो दरात ३० टक्क्यांहून अधिक घसरण अपेक्षित आहे, असे वृत्त 'बिझनेस स्टॅडर्ड'ने दिले आहे. (Tomato prices)
दरम्यान टोमॅटो बाजारात मोठ्या प्रमाणात आयात झाल्याने ऑगस्ट-डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्रात टोमॅटोचा दर काही प्रमाणात घसरला आहे. घाऊक आणि किरकोरळ या दोन्ही दरात घसरण होणार आहे. दरम्यान, टोमॅटोचा किरकोळ दर १०० रुपये किलोंपेक्षा कमी तर, घाऊक दर हा ३० टक्क्यांपेक्षा कमी येणार आहे, असे द इकॉनॉमिक टाइम्सने वृत्त दिले आहे. (Tomato prices)