पुढारी ऑनलाईन डेस्क : सायबर क्राईमला आळा घालण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्या दरम्यान आज (दि. १०) बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.
पोलीस महासंचालक यांच्या भेटीनंतर फडणवीस म्हणाले की, सायबर क्राईमला आळा घालण्यासंबंधी आमच्यात चर्चा झाली. देशातील सर्वात मोठा डायनॅमिक प्लॅटफॉर्म करण्याबाबत चर्चा झाली. सायबर क्राईमबाबतच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांविषयी चर्चा झाली. तसेच समाजात पसरत असणाऱ्या अफवांद्वारे होणाऱ्या दंगली याबाबत देखील आमची चर्चा झाली, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा