पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. १७) राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक (State Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये राज्याची अर्थव्यवस्था, शिक्षण, योजना आणि दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, राज्यातील शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करण्याबाबत चर्चा देखील करण्यात आली. यासह अन्य काही महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आले आहेत.
दिवाळीनंतर आज (दि. १७) पार पडलेल्या मंत्रालयातील बैठकीमध्ये राज्यातील 1345 हेक्टर क्षेत्र सिंचित करण्यात येणार असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेला मुदतवाढ देण्यात आली. त्याचबरोबर 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी देखील करण्यात आल्या आहेत. (State Cabinet Meeting)
हेही वाचा