Latest

Sanjay Raut On MH: महाराष्ट्रात कायदा, सुव्यवस्थेचा मुडदा पाडलाय; राऊत यांचा घणाघात

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : जमिनीच्या वादातून शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. या प्रकारावरून सुव्यवस्थेचा मुडदा पाडलाय, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (Sanjay Raut On MH)

राऊत पुढे म्हणाले, उल्हासनगरमधील पोलिस ठाण्यातच झालेल्या गोळीबाराला मुख्यमंत्री शिंदे जबाबदार आहेत. राज्य सरकारकडून गुंडांचा राजकारणासाठी उपयोग केला जात आहे. राजकारणासाठी गुंडांना जामिनावर बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. (Sanjay Raut On MH)

गृहमंत्र्यांमध्ये हिंमत असेल कारवाई करा- राऊत

पुणे, मुंबई, ठाणे आणि कोल्हापूर यांसारख्या संवेदनशील शहरात अशा प्रकारे गुंडांना धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील काही गुंडांच्या सुटकेमागे ३ मंत्र्यांचा हात आहे. पोलिस ठाण्यात झालेला गोळीबार हा मुख्यमंत्री शिंदेंमुळे झाला असल्याचे आरोपीने स्पष्ट केले आहे. शिंदेंसारखे मुख्यमंत्री असतील तर गुन्हेगाराच तयार होणार असा आरोप देखील राऊत यांनी केला. त्यामुळे गृहमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांना तत्काळ कारवाई करावी, असे आव्हान खासदार राऊत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिले आहे. (Sanjay Raut On MH)

 हे रामराज्य आहे का?- राऊत यांचा सवाल

गोळीबाराच्या घटनेवर मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो असे अजित पवार म्हणतात, पण हा प्रकार केवळ चर्चेइतका मर्यांदित आहे का? आजच्या गोळीबारानंतर गृहमंत्र्यांना बोलायला तोंड उरलंय का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. रामावर, रामराज्यावर तुम्ही हक्क सांगताय, पण हे रामराज्य आहे का? असा सवाल देखील राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT