Latest

रत्‍नागिरी : गोळप मध्ये आंबा बागेत नेपाळी सख्या भावांचा खून

निलेश पोतदार

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील गोळप येथे आंबा बागेत काम करणाऱ्या दोघा सख्ख्या नेपाळी भावांचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दोघांवर तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर प्रहार करून हा खून केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली.

या विषयी अधिक माहिती अशी की, रत्नागिरी शहरानजीकच्या गोळप गावातील मुदससर मुकादम यांच्या आंबा बागे दोघा सख्या भावांचा खून झाल्‍याची घटना समोर आली आहे. आज (मंगळवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. बागेत रखवाली करणाऱ्या भक्त बहादूर थापा आणि ललन बहादुर थापा दोन नेपाळी गुरख्यांचे मृतदेह दिसुन आले. डोक्यात खोलवर प्रहार करीत या दोन सख्खे भाऊ असलेल्या गुरख्याना मारण्यात आले होते.

रत्नागिरी पोलीस घटनास्थळी पोहचले असून श्वान पथक देखील मागवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर डी वाय एस पी निलेश माईणकर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पूर्णगड पोलीस स्टेशनचे धायकर घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी संशयितांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT