पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर महाराष्ट्र सैनिकांनी कोणत्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊ नये, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच मी योग्य वेळ आल्यानंतर सध्याच्या सुरू असलेल्या राजकारणावर भूमिका मांडेन, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यांनी फेसबुक पोस्ट आणि ट्वीटरच्या माध्यमांतून या सूचना दिल्या आहेत.
शनिवारी (दि. ८ ऑक्टो) निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात शिवसेनेचे (Shivsena) नाव आणि चिन्ह गोठवले. यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत मनसैनिकांनी कोणतीही प्रतिक्रीया देऊ नये, असे आदेश दिले आहेत.