खेड, पुढारी वृत्तसेवा : स्वतःचं अफाट कर्तृत्व जेव्हा दाखवण्याची कोणतीच शक्यता दिसत नाही, तेव्हा अशा प्रकारचे आरोप केले जातात. रायगडमध्ये निष्क्रियता काय असते, हे अनंत गीते यांनी दाखवून दिले आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आज (दि.५) येथे लगावला.
खेड शहर शिवसेना शाखेला भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना नेते रामदास कदम, आमदार योगेश कदम आदी उपस्थित होते.
तटकरे पुढे म्हणाले की, अनंत गीते यांच्याकडे निवडणुकीत कोणतेच मुद्दे राहिलेले नाहीत. ते वाटेल, त्या प्रकारे आरोप करत आहेत, ही निवडणूक माझी त्यांच्यासमोर तिसरी आहे. त्यांनी कितीही वल्गना केल्या, तरी रायगड – रत्नागिरीची जनता सुज्ञ आहे. सक्रियपणे जनतेचे प्रश्न मी कसे सोडवले आहेत, हे जनतेने पाहिलेले आहे. त्यामुळे मागील निवडणुकीमध्ये जनतेने मला स्वीकारले आहे. त्यामुळे गीते यांची जनता दखल घेणार नाही.
हेही वाचा