पुढारी ऑनलाइन डेस्क : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त स्मृतीस्थळावर आज ठाकरे गटाकडून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातून स्मृतीस्थळावर आलेले नेते आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीने ठाकरे गटाचे मोठे शक्तीप्रदर्शन दिसून आले. दरम्यान, उद्धव ठाकरेंसोबत सर्वांनी बाळासाहेबांच्या चित्रांच्या प्रदर्शनस्थळालाही भेट दिली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. ज्या आरएसएसचे हे कार्यकर्ते आहे त्या संघांचा स्वातंत्र्यलढ्याशी काही संबंध होता का? त्यामुळे ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी काडीमात्र संबध नाही. त्यांनी स्वतांत्र्यावीरांवर बोलू नये. असे ठाकरे यावेळी म्हणाले.
केंद्रात भाजपचे सरकार असतानाही अजूनपर्यंत सावरकरांना भारतरत्न का नाही दिला असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला. भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि राजकारणामुळे देशात अराजकता माजली असून जनतेचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
ठाकरे पुढे म्हणाले, भाजपने पीडीपी सारख्या पक्षाबरोबर युती करून सरकार स्थापन केले त्यावेळी भाजपचे हिंदुत्व कुठे जाते. भाजपला फक्त सत्ता हवीय आणि सत्तेसाठी ते काहीही करतील. यावेळी ठाकरे परिवारासोबत सुभाष देसाई, संजय राऊत आदी नेते आणि शिवसैनिक उपस्थित होते.
हे वाचलंत का?