Latest

नाशिक : वरातीत नाचायला गेलेल्या तरुणाला हातपाय बांधून फेकले धरणात, तीन दिवसांनी मृतदेह तरंगत आला वर

गणेश सोनवणे

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा 
तालुक्यातील नांदूर येथील एका तरुणाचे हातपाय बांधून त्यास धरणात फेकून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने नांदूर गावात खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील नांदूर येथील अमोल धोंडीराम व्हडगर (२२) रा. नांदूर ता. नांदगांव या तरुणाचे हातपाय बांधून त्याला काही जणांनी येथील नाग्या साग्या धरणातील पाण्यात फेकले. त्यात त्याचा मृत्यू झाला. तीन दिवसांनंतर मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसल्याने घटनेचा उलगडा झाला. दि. २४ रोजी रात्री उशीरा अज्ञातांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

डीवायएसी समिरसिंह साळवे, पो. नि. रामेश्वर गाढे, स. पो. नि. दिपक सुराडकर, पो. ह सावकारे हे मारेक-यांच्या शोधात आहेत. अमोल हा (दि. २३) नांदूर येथील एका वरातीत नाचायला जातोय, असे सांगून घरातून निघाला पण तो रात्री घरी परतला नाही. दुस-या दिवशी नातेवाईकांनी शोध घेवूनही त्याचा पत्ता लागला नाही. त्यामुळे पोलिसांना तसे कळविण्यात आले होते. दुस-या दिवशी (दि. २४) नाग्या साग्या धरणावरील पाण्यावर  नागरिकांना एक मृतदेह तरंगताना अाढळला. हा मृतदेह अमोल व्हडगर चा असल्याची ओळख पटली व मध्यरात्री युवकाला हातपाय बांधून धरणात टाकून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून मारेक-यांचा पोलिस शोध घेत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT