पुढारी ऑनलाईन डेस्क : भाग्य दिले तू मला या मालिकेत सध्या रत्नमाला आणि राजवर्धन यांच्या नात्यात आलेला दुरावा पाहिला आता या आई मुलाच्या नात्यात गोडवा पाहायला मिळणार आहे. राजचे वडील अनिरुद्धच हे षडयंत्र रचत असून भाऊ सुदर्शनला हाताशी घेऊन हा प्लॅन आखलेला असतो. पण हे सगळं अनिरुद्ध का करतोय आणि त्यानंतर अनिरुद्ध राजचं काय होईल, हे कळणार आहे. वडिलांना त्यांचा हक्क आणि अधिकार मिळवून देण्याच्या नादात राज आणि रत्नमालाच्या नात्यात दुरावा आला होता.
संबंधित बातम्या –
अनिरुद्धचा प्लान इतका शातीर आहे कि तो कुणाला काहीही कळू देत नाही . कावेरीच्या हाती नवा पुरावा येणार आहे. त्यामुळे राजला सूत्रधाराचं नाव कळणार आहे. आई आणि मुलामधलं अंतर कमी होतंय खरं… पण वडिलांच काय? त्यांचा प्लॅन कोण आणि कसा उद्ध्वस्त करणार? लवकरच या खेळाला कोण आणि कसा ब्रेक लावणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. यासाठी भाग्य दिले तू मला कलर्स मराठीवर पाहा.