पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.०१) मुंबईत सर्वपक्षीय बैठक सुरू असतानाच दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदार आक्रमक झाले आहेत. विधीमंडळाच विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीसाठी मंत्रालयाबाहेर सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलन करणाऱ्या आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, सर्वपक्षीय नेत्यांनी शांततेच आवाहन करावं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मनोज जरांगेंच आंदोलन हाताळण्यात सरकार कमी पडलं, असा आरोप काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे.
संबंधित बातम्या :