पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडच्या जामतारा आणि विद्यासागर स्थानकादरम्यान मोठा अपघात झाला. १२ जणांना रेल्वेने धडक दिल्याने मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत २ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अंधारामुळे किती जणांना जीव गमवावा लागला याचा नेमका अंदाज अद्याप समोर आलेला नाही. अंधारामुळे बचावकार्यालाही विलंब होत आहे. (Jharkhand Train Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील जामतारा येथील कलझारिया स्टेशनजवळ ट्रेनने 12 जणांना धडक दिल्याचे वृत्त आहे. आंग एक्स्प्रेसला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर ट्रेन अचानक थांबवण्यात आली. आगीच्या वृत्ताने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. प्रवासी इकडे तिकडे उड्या मारू लागले. दरम्यान समोरून येणारी झाढा-आसनसोल गाडी प्रवाशांच्या अंगावरून गेली. (Jharkhand Train Accident)
हेही वाचा