पुढारी ऑनलाईन डेस्क: बांगलादेश हा एक चांगला संघ आहे. ते घरच्या मैदानावर खूप चांगले क्रिकेट खेळतात. त्यामुळे आमच्यासाठी हे खूप आव्हानात्मक असेल. आम्ही हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज झालो आहोत. आमच्याकडे स्वतःला तयार करण्यासाठी 2-3 दिवस होते आणि आम्ही प्रत्येक बाबींत स्वतःला तयार केले. आम्ही सकारात्मक क्रिकेट खेळण्याकडे लक्ष दिले आहे, असे भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांनी म्हटले आहे. ढाका येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या T20 सामन्यापूर्वी कौर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होते.
हेही वाचा