Latest

Team India New Captain : टीम इंडियाला ऑगस्टमध्ये मिळू शकतो नवा कर्णधार! लवकरच होणार मोठी घोषणा

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India New Captain : टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. यानंतर तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळवले जातील. कॅरेबियन दौऱ्यानंतर लगेचच टीम इंडिया ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. दरम्यान, हार्दिक पंड्याला विश्रांती देण्यात आल्याने टीम इंडियाला नवा कर्णधार मिळण्याची अपेक्षा आहे.

रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या आयर्लंडविरुद्धच्या तीन टी-20 मालिकेत संघाचा भाग नसतील. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच संघाला आशिया कप खेळण्यासाठी श्रीलंकेला जावे लागणार आहे. तिथे भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध कँडी येथे होणार आहे. यामुळे वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याचे बोलले जात आहे. (Team India New Captain)

दरम्यान, एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, आयर्लंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांमध्ये संघाचा कर्णधार म्हणून सूर्यकुमारची निवड होऊ शकते. तो सध्या टी-20 संघाचा उपकर्णधार आहे आणि जर तो कर्णधार झाला तर जसप्रीत बुमराहकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात येईल. शुक्रवारी खुद्द बीसीसीआयने बुमराहच्या फिटनेसविषयी अपडेट देत भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी तो सज्ज आहे असे संकेत दिले होते. त्यामुळे आता तो आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळताना दिसेल, अशी शक्यता आहे. (Team India New Captain)

SCROLL FOR NEXT