Latest

rishabh pant and ravindra jadeja : ऋषभ पंत मॅन ऑफ सीरीज ठरल्याने जडेजावर अन्याय ?

अमृता चौगुले

बंगळूर; पुढारी ऑनलाईन : भारताने सोमवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर तिसऱ्या दिवशी श्रीलंकेविरुद्धची दुसरी कसोटी 238 धावांनी जिंकली. यष्टिरक्षक ऋषभ पंतची (rishabh pant and ravindra jadeja) 'मॅन ऑफ द सिरीज' आणि श्रेयस अय्यरची 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पंतने विकेटच्या मागे दमदार कामगिरी करत 8 विकेट्स घेतल्या आणि विक्रमी अर्धशतकासह 185 धावा केल्या आणि मालिकावीरासाठी तो सर्वोत्तम पर्याय होता यात शंका नाही, परंतु चाहते या गोष्टीबद्दल थोडे नाराज होते.

रवींद्र जडेजाला (rishabh pant and ravindra jadeja) मालिकावीराचा पुरस्कार मिळायला हवा होता, असे काही चाहत्यांना वाटते. रवींद्र जडेजानेही पहिल्या कसोटीत उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीची कामगिरी दाखवली. ज्यामध्ये आपल्या अष्टपैलू खेळीत त्याने 175 धावा केल्या आणि नऊ विकेट घेतल्या. मात्र, दुसऱ्या कसोटीत त्याने चांगली कामगिरी केली नाही आणि त्याने अनुक्रमे 4 आणि 22 धावा केल्या. जडेजाने पहिल्या कसोटीत घेतलेल्या नऊ विकेट आणि दुसऱ्या कसोटीत एका विकेटसह 10 विकेट्स घेतल्या आहेत.

दुसरीकडे, या मालिकेत ऋषभ पंतची (rishabh pant and ravindra jadeja) कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे कारण त्याने पहिल्या कसोटीत 97 चेंडूत 96 धावा, दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 39 धावा आणि दुसऱ्या डावात 31 चेंडूत 50 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १२० च्या वर होता, तर सरासरी ६१ पेक्षा जास्त होती.

प्लेअर ऑफ द सीरीज पुरस्काराबाबत (rishabh pant and ravindra jadeja) एका युजर्सने लिहिले आहे मालिकेत सर्वाधिक धावा आणि 10 विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजाला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू मिळायला हवा होता. इतर चाहत्यांचीही अशीच प्रतिक्रिया होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांची मालिका पहिल्या कसोटीत एक डाव आणि २२२ धावांनी तर दुसऱ्या कसोटीत २३८ धावांनी जिंकली.

दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने पहिल्या डावात 59.1 षटकांत दहा गडी गमावून 252 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात 68.5 षटकांत नऊ गडी गमावून 303 धावांवर डाव घोषित केला. श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 35.5 षटकांत 109 धावांत गुंडाळला गेला आणि दुसऱ्या डावात दहा गडी गमावून 208 धावा केल्या, भारतीय संघाने 238 धावांनी सामना जिंकून दोन सामन्यांची कसोटी मालिका 2 – 0 अशी खिशात घातली.

SCROLL FOR NEXT