Latest

Ind vs Aus 4th T20 : भारताचे ऑस्ट्रेलियासमोर १७५ धावांचे आव्हान

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेतील चौथा सामना रायपूरच्या शहिद वीर नारायण सिंग स्टेडियमवर खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताने रिंकू सिंग आणि जितेश शर्माच्या फटकेबाजीच्या जोरावर १७४ धावा केल्या असून ऑस्ट्रेलियासमोर १७५ धावांचे आव्हान ठेवले आहे. (Ind vs Aus 4th T20)

भारताकडून यशस्वी जयस्वाल २८ चेंडूमध्ये ३४ धावा, ऋतुराज गायकवाड २८ चेंडूमध्ये ३२ धावा, रिंकू सिंग २९ चेंडूमध्ये ४६ धावा आणि जितेश शर्माने १९ चेंडूमध्ये ३५ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून तनवीर संघा २ तर बेन द्वारशुईसने ३ विकेट पटकावल्या. तर जेसन बेहरेनडॉर्फ आणि आरोन हार्डीने प्रत्येकी १ विकेट घेतली. सातत्याने विकेट पटकावल्याने भारताला १७४ धावांपर्यंत रोखण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले आहे. (Ind vs Aus 4th T20)

भारतीय संघ – यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, दीपक चहर, आवेश खान, मुकेश कुमार (Ind vs Aus 4th T20)

ऑस्ट्रेलियन संघ – जोश फिलिप, ट्रायव्हस हेड, बेन मॅकडरमॉट, आरोन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड (c&wk), बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तनवीर संघा (Ind vs Aus 4th T20)

हेही वाचलत का?

SCROLL FOR NEXT