पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यातील अनेक भागाला पावसाने झोडपले आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. तर पश्चिम घाटमात्यावरील पालघार, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांमाध्ये अतिवृष्टी सुरू आहे. दरम्यान आज (दि.२१ जुलै) आणि उद्या (दि.२२जुलै) देखील राज्यातील मध्य महाराष्ट्रासह कोकण आणि गोवा राज्याला रेड अलर्ट जारी केला असून, अतिवृष्टीचा अंदाज असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने ट्विटरवरून दिली आहे.
हवामान विभागाने आज दिलेल्या बुलेटीननुसार, पालघार, ठाणे, रायगड,पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी आज (२१ जुलै) तर पालघर आणि पुणे उद्या (दि.२२ जुलै) या जिल्ह्यात अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महारष्ट्रासह, गोवा, गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छला देखील 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. असे हवामान विभागाने म्हटले आहे.
दरम्यान २४ जुलैपर्यंत वायव्य भागात आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे चार दिवस (२५ जुलैपर्यंत) संपूर्ण कोकणासह, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिमुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच या दरम्यान गोवा आणि गुजरातमधील काही राज्यांत देखील अशीच स्थिती असणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिलेल्या बुलेटिनमध्ये सांगितले आहे.तसेच पुढच्या काही तास संपूर्ण मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, असेही हवामान खात्याने दिलेल्या बुलेटिनमध्ये स्पष्ट केले आहे.