हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा भागामध्ये पावसाने हाहाकार उडाला आहे. काल रात्रभर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने गावाजवळ असलेल्या आसना नदीला पूर आला आहे. नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर पत्रातून थेट गावात शिरले आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक घरात पुराचे पाणी शिरले आहे. यामध्ये अनेकांच्या संसारउपयोगी साहित्याचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. जोरदार झालेल्या पावसाने गावातील मोबाईल नेटवर्क त्याचबरोबर विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे.
येथील आसना नदीकाठच्या अनेक गावांना या पावसाचा फटका बसला आहे. या गावांमध्ये सध्या चार फुटांपेक्षा अधिक पाणी साचलेले आहे. पुराचे पाणी गावात शिरल्याने येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. या पावसामुळे मोठे नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पाहा व्हिडिओ : हिंगोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस; आसना नदीला पूर, कुरुंदा गाव पाण्याखाली