पुढारी ऑनलाईन डेस्क : आज (दि. २) संपूर्ण भारत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करत आहे. या निमित्ताने प्रत्येक देशवासीय त्यांना आदरांजली वाहत आहे. यानिमित्त राजधानी दिल्लीतील राजघाटावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट येथे महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त विजयघाटावर पोहोचून पंतप्रधान मोदींनी लाल बहादूर शास्त्री यांनाही पुष्पहार अर्पण केला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही महात्मा गांधींना राजघाटावर पोहोचून पुष्पहार अर्पण केला. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही राजघाटावर महात्मा गांधींना पुष्पांजली वाहिली.
संबंधित बातम्या :