पुढारी; ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा भाऊ अभिनेता सोहेल खानचा सुखी संसार २४ वर्षानंतर तुटत आहे. सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान ( Seema Sachdev Khan ) गेल्या १३ तारखेला घटस्फोटाचा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. तर याचदरम्यान सीमा खानने आपले नावचं बदलले आहे. यामुळे सोशल मीडियावर दोघेजण विभक्त होत असल्याचे निश्चित झाले आहे. परंतु, दोघांनी याबाबत अधिकृत्त कोणतीच घोषणा केलेली नाही.
सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान यांचा सुखी संसार २४ वर्षानंतर तुटत असल्याने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसत आहे. दोघांनी नुकतेच घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. एका रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, सोहेल आणि सीमा काही दिवसांपासून एकत्र राहत नव्हते. त्यामुळेच त्यांनी अधिकृतपणे वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. तर नुकतेच सीमा खानने ( Seema Sachdev Khan ) आपल्या इन्स्टाग्रामवरील नाव बदल्याने सोशल मीडियात खळबळ उडाली आहे.
सीमा आणि सोहेल दोघेजण घटस्फोट घेणार असल्याच्या वृत्तावर काही चाहत्यांना विश्वासच बसेनासा झाला आहे. याच दरम्यान सीमाने आपलं इन्स्टाग्राम प्रोफाइलवरील सीमा खान हे नाव बदलून आधीचे सीमा किरण सचदेह असे ठेवले आहे. याशिवाय सीमाने एक इंस्टाग्राम स्टोरी देखील शेअर केली आहे. यात तिने 'शेवटी सर्व काही संपून जाईल. कसे हे जाणून घेण्याची गरज नाही. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. सीमा किरण सचदेहची ही स्टोरी खरं सांगत आहे. सोहेलपासून वेगळे व्हावे लागणार आहे. बाकी सत्य फक्त तोच सांगू शकतो.' असे म्हटले आहे. या सगळ्यावरून लवकरच दोघाचं नातं संपुष्टात येईल हे सत्य आहे.
अभिनेता सोहेल खानने सीमा सचदेवशी १९९८ मध्ये लग्न केले होते. सीमा व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे. पंजाबी हिंदू कुटुंबातील, सीमा आणि सोहेल पहिल्या भेटीतच एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, दोघांचे हे नाते त्यांच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. सीमाचे कुटुंबीय या लग्नासाठी तयार नव्हते. सोहेल खान दिग्दर्शित 'जब प्यार किया तो डरना क्या' हा चित्रपट २७ मार्च रोजी प्रदर्शित झाला. त्याच दिवशी सोहेलने सीमासोबत घरातून पळून जाऊन आर्य समाज मंदिरात लग्न केले होते.
हेही वाचलंत का?