Latest

“आमचे डोळे उघडले…” एग्रातील स्‍फोटावर ममता बॅनर्जींनी मागितली परिसरातील नागरिकांची माफी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्‍या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज ( दि.२७) पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एग्रातील खडीकुल ग्रामस्‍थांची माफी मागितली. गुप्तचर यंत्रणेने योग्य काम केले असते तर दुर्घटना टाळता आली असती, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. २६ मे रोजी एग्रात एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते.

पीडित कुटुंबीयांना नुकसान भरपाईचे वाटप

स्फोटानंतर ११ दिवसांनी ममता बॅनर्जी यांनी एग्रातील खडीकुल गावात गेल्‍या. त्यांनी स्‍फोटात मृत्युमुखी पडलेल्या व जखमींच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईच्‍या धनादेश वाटप केले. त्‍या म्‍हणाल्‍या की, "आज माझे डोळे उघडले आहेत. या घटनेबद्दल मी तुमच्यासमोर डोके टेकवून माफी मागते. गुप्तचर यंत्रणेने योग्य काम केले असते तर दुर्घटना टाळता आली असती."

मृतांच्‍या कुटुंबातील एकाला होमगार्डची नोकरी

यावेळी ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, आग्रा येथील फटाका कारखान्यातील स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना अडीच लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच कुटुंबातील एकाला होमगार्डची नोकरी दिली जाईल. मी ते माझ्या नियुक्ती पत्रासोबत आणले आहे.
बेकायदेशीर कारखान्याचा मालक आणि मुख्य आरोपीच्या कुटुंबातील दोन सदस्यांना अटक करण्यात आली आहे, असेही त्‍यांनी सांगितले. आमच्या सरकारने निर्णय घेतला आहे की या घटनेबाबत येत्या दोन आठवड्यांत मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली अहवाल तयार केला जाईल. या अंतर्गत ग्रीन फटाक्यांचे क्लस्टर बनवले जाणार आहे, अशी माहिती त्‍यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT