पुढारी ऑनलाइन डेस्क : गेल्या नऊ महिन्यांत पाकिस्तानमध्ये सहा भारतीय कैद्यांचा मृत्यू झाला आणि भारताने इस्लामाबादकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी सांगितले.
एमईएचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, मृतांमध्ये पाच मच्छिमारांचा समावेश आहे. "परिस्थिती चिंताजनक आहे. सर्व मृतांनी त्यांची शिक्षा पूर्ण केली होती," असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. "त्या देशातील भारतीय कैद्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही पाकिस्तानची जबाबदारी आहे," असे MEA प्रवक्त्याने सांगितले.
हे ही वाचा :