पुढारी ऑनलाईन डेस्क: आयटीआयमधील (ITI) शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा ५०० रुपये विद्यावेतन मिळणार आहे, अशी घोषणा आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली. कौशल्य विकास योजनेअंतर्गत राज्यातील आयटीआय शिल्प कारागिर विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आली आहे. याबरोबर आणखी काही महत्त्वाचे निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत.
आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विविध निर्णय घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
- राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार. ५ हजार कोटीचा प्रस्ताव. (आदिवासी विकास विभाग)
- गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा. प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा. (अन्न व नागरी पुरवठा)
- आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा ५०० रुपये मिळणार. (कौशल्य विकास)
- मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी. ( महसूल विभाग)
- महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द. (गृह विभाग)
- केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम. राज्याचा हिस्सा वाढला. ( महिला व बाल विकास)
- सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे. (सहकार विभाग)
- दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन. (विधी व न्याय विभाग)
- मंडणगड येथे दिवाणी न्यायालय. (विधी व न्याय विभाग)
हेही वाचा: