Latest

No-Confidence Motion Debate | मणिपूर मुद्द्यावर केंद्र सरकार ७० दिवस गप्प का?; ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा सवाल

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : काहीजण मला आणि आमच्या सहकाऱ्यांना हिंदुत्त्व शिकवतात, पण मी ते घेऊनच जन्माला आलो आहे. हिंदुत्त्वात भित्रेपणा नसतो, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटातील जुन्या सहकाऱ्यांवर केला. मणिपूर मुद्द्यावर बोलताना " केंद्र सरकार गप्प बसले नसते, तर हा प्रस्ताव आलाच नसता," असेही सावंत म्हणाले. ते अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत बोलत होते.

ज्या नेत्याच्या नावाने पंतप्रधानांनी संपूर्ण व्यासपीठावरून भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला होता, तो नेता तीन दिवसांनी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतला गेला आणि महाराष्ट्र सरकारचा भाग बनला. ज्यांच्यावर खुद्द पंतप्रधान हल्ला करत होते. काही दिवसांनी ते महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री झाले. या विश्वासघातकी लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असेही अरविंद सावंत यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांना सुनावले.

मणिपूरच्या मुद्द्यावर केंद्र सरकार ७० दिवस शांत होते. अविश्वास प्रस्ताव हा केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेत बोलायला आणण्यासाठी नसून, मणिपूरमध्ये अत्याचार होत असतानाही केंद्र सरकार का गप्प होते; हे जाणून घेण्यासाठीही आहे, असे मत संसद सभागृहात बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी मांडले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT