पुढारी ऑनलाईन डेस्क : अप्पी आणि अर्जुनची लग्नानंतरची पहिली दिवाळी असल्याने, कदम घराण्यात काय विशेष असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. (Appi Aamchi Collector ) घरच्या सुनेला सरकारांकडून कदम घराण्याचा पिढ्यानपिढ्या सांभाळलेला दागिना, 'राणीहार'हा अप्पीला दिला जाणार तो हार बघून मनीचे डोळे फिरतात. ती दिवाळीसाठी घरी आलेल्या अप्पीच्या घरच्यांच्या फराळाच्या डब्यात तो राणीहार टाकते. हार बापुंकडे सापडल्याने घरात तमाशा होतो. तेव्हा अर्जुन हुशारीने असा काही जुगाड करतो की सर्वांसमोर मनीमावशीचं भांडं फुटतं आणि घरच्या लक्ष्मीला म्हणजेच अप्पीला, अर्जुन स्वतःच्या हातांनी लक्ष्मीपूजनात 'राणीहार' अप्पीच्या गळ्यात घालतो. सर्व परिवार एकत्र येऊन अर्जुन-अप्पीची पहिली दिवाळी आणि लक्ष्मी पूजा साजरी करतात. (Appi Aamchi Collector)
संबंधित बातम्या-
मालिकेत याआधी दिवाळीची तयारी जोरदार अआहे. अप्पीच्या घरात दिवाळीची साफसफाई चालू आहे पण धुळीचा त्रास होईल म्हणून घरचे अप्पीला थोडं लांब ठेवलं जातंय. एकीकडे घरात तिला कोणही काम करायला देत नाहीयेत आणि दुसरीकडे अर्जुनने अप्पीला ऑफिसला न जाण्याचा सल्ला दिलाय, अप्पीला घरी बसुन करमत नाहीये.
आता ह्या दिवाळीत अप्पीला खुश ठेवण्यासाठी अर्जुन यातून कसा मार्ग काढेल. दिवाळीत अर्जुन अप्पीला पुन्हा कामावर जायची परवानगी देईल का? हे सर्व लवकरच पाहायला मिळणार.'