नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा- राम सेतू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल झाली असून, 'राम सेतू' ला राष्ट्रीय स्मारक आणि वारसा स्थळ म्हणून घोषित केले जावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. राम सेतूच्या आसपास समुद्रात काही किलोमीटरपर्यंत दरवाजा बसविण्याचे आदेश केंद्राला दिले जावेत, असेही याचिकेत म्हटले आहे.
'राम सेतू' संदर्भातील भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांची याचिका दीर्घकाळापासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हे स्थळ ऐतिहासिक स्मारक म्हणून हे जाहीर केले जावे, असे स्वामी यांचे म्हणणे असून याचिकेवर लवकर सुनावणी घेतली जावी, अशी विनंती त्यांनी केलेली आहे. त्यावर केंद्राने आपले म्हणणे मांडावे, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र अद्यापपर्यंत सरकारकडून कोणतेही प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले नाही.
हेही वाचा :