पुढारी ऑनलाईन डेस्क : ठाकरे गटाचे माजी नगसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरीसने निर्घृण हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या हत्येची चौकशी करण्यात यावी. तसेच मॉरीस याने स्वत: जीवन संपवलेले नाही, त्याला दुसरे कुणीतरी मारले आहे, याचीही चौकशी करण्याची मागणी ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांनी आज (दि. १) विधान परिषदेत केली. Abhishek Ghosalkar case
दरम्यान, अभिषेक घोसाळकर यांच्यावर हल्ला कुणी केला? असा सवाल करून त्यांचा वर्चस्वावादातून खून झाला का ? याचीही चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. Abhishek Ghosalkar case
वाद झाला नव्हता, तर महेंद्र थोरवे यांनी कबुली का दिली, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या वादावर वडेट्टीवार यांनी केली. राज्यात हत्येचे सत्र सुरू झाले आहे. नागपुरात मागील २० दिवसांत १३ खून झाले आहेत, अशी माहितीही वडेट्टीवार यांनी दिली.
हेही वाचा