पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर भारताने सूर्यमोहिम 'आदित्य-L1' हाती घेतली. या मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता इस्रोच्या शास्त्रज्ञासह, कोट्यवधी भारतीयांना प्रतीक्षा आहे ती, सूर्ययान 'निश्चित स्थळी' पोहचण्याची. भारताचे सूर्ययान 'आदित्य-L1' हे लवकरच म्हणजे २०२४ मध्ये पृथ्वी सूर्यामध्ये असलेल्या पॉइंट L1 निश्चित स्थळी पोहचणार असल्याचे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात इस्रोच्या अध्यक्षांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. (Aditya-L1 Mission)
इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी एएनआयला दिलेल्या माहितीत सांगितले, ISRO चे आदित्य-L1 अंतराळयान जानेवारीच्या मध्यापर्यंत लॅगरेंज पॉईंट१ (L1) वर पोहोचणार आहे. तसेच या मोहिमेचे उद्दिष्ट सूर्याचा सर्वसमावेशक अभ्यास करणे आहे आणि ते L1 भोवती प्रभामंडल कक्षेत ठेवले जाईल, जे सूर्याच्या दिशेने पृथ्वीपासून अंदाजे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे, असे देखील एस सोमनाथ यांनी स्पष्ट केले. (Aditya-L1 Mission)
आदित्य-L1 मोहिमेने २ सप्टेंबर रोजी पृथ्वीवरून आपला प्रवास सुरू केला होता. L1 बिंदूवर पोहोचण्यासाठी त्याला प्रक्षेपनानंतर अंदाजे ११० दिवस लागतील अशी अपेक्षा आहे. हा ११० दिवसांचा प्रवास मोहिमेच्या टाइमलाइनचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो जानेवारीच्या मध्यापर्यंत त्याचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे, असेही एस सोमनाथ यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. (Aditya-L1 Mission)
पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये एकूण ५ लॅगरेंज पॉईंट ( What is Lagrange point 1? ADITYA-L1) आहेत. या पॉईंटवर सूर्य आणि पृथ्वी या दोन्हीतील गुरुत्वाकर्षण एखाद्या लहान वस्तूचे सेंट्रिफ्युगल फोर्स (अपकेंद्री बल) संतुलित ठेवते. त्यामुळे ही लहान वस्तू या सूर्य आणि पृथ्वीच्या अनुषंगाने स्थीर राहाते. लॅगरेंज पॉईंट १ हा पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. सूर्याची पृथ्वीभोवतीची जी कक्षा आहे, त्यावर हा लॅगरेंज पॉईंट १ आहे. (what are earth-sun lagrange points)
'आदित्य-L1' मोहीम स्पेसक्राफ्ट सात भिन्न पेलोड्ससह सुसज्ज आहे. ज्यात सौर ज्वाला, सौर वारा, कोरोनल मास इजेक्शन, कोरोनल हीटिंग, चुंबकीय पुनर्कनेक्शन आणि बरेच काही यांचा अभ्यास आदित्य L1 करणार आहे. या पद्धतीने हे अंतराळयान डिझाइन करण्यात आले आहे. यापैकी चार उपकरणे सूर्याच्या प्रकाशाचे निरीक्षण करतील आणि सौर संशोधनासाठी मौल्यवान डेटा प्रदान करतील. इतर तीन उपकरणे सूर्याभोवती प्लाझ्मा आणि चुंबकीय क्षेत्राशी संबंधित इन-सीटू पॅरामीटर्स मोजतील, असे देखील सोमनाथ यांनी म्हटले आहे. या स्पेसक्राफ्टच्या प्लेलोडवर सूर्याच्या पृष्ठभागावरील पार्टिकल (कण) आणि प्लाज्मा वातावरण यांचा नैसर्गिक स्थितीत अभ्यास केला जाणार आहे. सूर्याचा कोरोना भागाचे फिजिक्स आणि हा कोरोना कशाप्रकारे तप्त होतो, हे समजून घेण्यासाठी देखील या मोहिमेत अभ्यास केला जाणार आहे.
या मोहिमेचे वैशिष्ट्यं म्हणजे सूर्याच्या बाह्यभागाचा सूक्ष्मपणे होणारा अभ्यास आणि सूर्याच्या अल्ट्राव्हॉयलेट प्रकाशात मिळवाता येणाऱ्या प्रतिमा हे ठरणार आहे. एकूणच काय तर सूर्याचा पृथ्वीवरील हवामान आणि अंतराळातील हवमान यांच्यावर कसा प्रभाव पडतो, या प्रकाश टाकण्याचे काम आदित्य एल १ करणार आहे, त्याचा मोठा फायदा पर्यावरण आणि तंत्रज्ञान अभ्यासात आणि विकासात होणार आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून 'इस्रो' सूर्याचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकेल. सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान, सौरवादळे, कॉस्मिक रेंज आणि इतर बर्याच गोष्टींचा अभ्यास करणे 'इस्रो'ला शक्य होणार आहे. यासोबतच लॅग्रेंज पॉईंटजवळच्या कणांचाही अभ्यास 'आदित्य एल-1' करणार आहे. त्याखेरीज सूर्याबद्दल माहीत नसलेली अनेक रहस्ये उलगडली जातील, अशी अपेक्षा आहे. सूर्याचे जे वेगवेगळे थर आहेत, त्याबद्दल माहिती मिळेल. 'आदित्य एल-1'चा कालावधी पाच वर्षांचा असेल. या काळात तो सूर्याभोवती फेर्या मारेल आणि सूर्यावरील वादळे व अन्य घडामोडींसंबंधी माहिती मिळवेल. 'चांद्रयान-3'प्रमाणेच 'आदित्य एल-1' सर्वप्रथम पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करेल. काही फेर्या मारेल. त्यानंतर १५ लाख किलोमीटरचा प्रवास करून 'एल-1' पॉईंटवर पोहोचेल. या पॉईंटवर फेर्या मारताना 'आदित्य एल-1' सूर्याच्या बाहेरच्या थराबद्दल माहिती देईल. (Aditya L1 Launch)
इस्रोचे येत्या काही महिन्यांत व्यस्त वेळापत्रक आहे, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी नमूद केले. दरम्यान आदित्य-L1 मोहिमेनंतर, त्यात अनेक नियोजित प्रक्षेपणांचा समावेश आहे, जसे की GSLV, SSLV, गगनयान मानवरहित मिशन आणि जानेवारीपूर्वी PSLV चे प्रक्षेपण असे नियोजन आहे. हे प्रक्षेपण अंतराळ संशोधन आणि संशोधनात प्रगती करण्यासाठी इस्रोची वचनबद्धता अधोरेखित करतात. त्यानंतर पृथ्वीच्या अंतराळ कक्षेत 'भारतीय अंतराळ स्थानक' उभारण्याचे कामही इस्रोला देण्यात आले आहे, असे देखील अध्यक्ष सोमनाथ यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.