Latest

Nayanthara : ‘जय श्री राम’चा नारा देत नयनताराने मागितली माफी; म्हणाली…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री नयनतारा ( Nayanthara ) गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'अन्नपुर्णी' चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या चित्रपटात हिंदु बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर हा चित्रपट ओटीटी वरून हटवण्यात आला. यानंतर आता नयनताराने 'जय श्री राम' चा नारा देत सोशल मीडियावर भल्ली मोठी पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेत्री नयनतारा ( Nayanthara ) हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच एक भल्ली मोठी पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांची माफी मागितली आहे. या पोस्टच्या सुरूवातीला तिने 'जय श्री राम' असे लिहिलं आहे. यात ती म्हटले की, 'ही पोस्ट मी भावनिक होवून लिहित आहे. माझा 'अन्नपुर्णी' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला असून हिंदु बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने हा चित्रपट वादात सापडला आहे हे तुम्हाला माहिती आहे.'

'आम्हाला या चित्रपटातून सकारात्मक संदेश द्यायचा होता. मात्र, नकळत आम्ही काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. लोकांना त्रास देण्याचा माझा किंवा माझ्या टीमचा हेतू नव्हता. मी स्वतः देवावर विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे. मी देवाची पूजा करते आणि मंदिरातही जाते. आम्ही ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत त्या सर्वांची मला माफी मागायची आहे. माझ्या गेल्या दोन दशकांच्या चित्रपट कारकिर्दीतील माझे उद्दिष्ट केवळ सकारात्मकता पसरवणे हेच आहे.' असे तिने म्हटलं आहे.

नेटफ्लिक्सवरील रिलीज झालेल्या 'अन्नपूर्णी' चित्रपटावरून वाद सुरू झाला होता. 'अन्नपूर्णी' मध्ये भगवान श्रीराम यांचा अपमान आणि हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे. काही नेटकरी हा चित्रपट अँटी हिंदू असल्याचं म्हटलं जात आहे. चित्रपटाच्या निर्मात्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आले आहे. मुंबईनंतर आता मध्य प्रदेशातील जबलपूरमध्येदेखील चित्रपटाचे निर्माते आणि संपूर्ण स्टारकास्ट विरोधात एका संघटनेने तक्रार दाखल केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT