नवी दिल्ली पुढारी ऑनलाईन : सध्या विवेक अग्निहोत्री यांचा 'द काश्मीर फाईल्स' चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातून त्यांनी काश्मीर पंडितांच्या स्थलांतराचा मुद्दा मांडला आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार्या या चित्रपटावर अनेक मान्यवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. आता बॉलीवूडचा अभिनेता, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यानेही या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ( Aamir Khan reaction )
दिल्लीमध्ये 'आरआरआर' चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमावेळी आमिर खान खानला 'द काश्मीर फाईल्स'वर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तो म्हणाला, "काश्मीर पंडितांवर झालेला अन्याय ही खूपच वेदनादायी गोष्ट आहे. या प्रश्नावर हा चित्रपट आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांनी तो जरुर पाहावा. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर अत्याचार होतो तेव्हा त्याच्यावर कोणती परिस्थिती ओढावते, याचा विचार प्रत्येक भारतीयाने करणे गरजेचे आहे".
द काश्मीर फाईल्स चित्रपट मी पाहणार आहे. हा चित्रपट सुपरहिट झाला याचा मला आनंद आहे. या चित्रपटाचे देशातील नागरिक समर्थन करत आहेत, याचाही मला विशेष आनंद आहे, असेही आमिर खानने या वेळी नमूद केले.
द काश्मीर फाईल्स चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई करत आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ३.३५ कोटी रुपयांची कमाई केली. आतापर्यंत सुमारे १६८ कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपट सुपरहिट ठरल्याने हा चित्रपट कन्नड, तामिल, तेलुगू आणि मल्याळम भाषेत डब करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
हेही वाचलं का?
पाहा व्हिडीओ :