मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्य निवडणूक आयोगातर्फे राज्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम शुक्रवारी जाहीर करण्यात आला. मतदान 18 सप्टेंबर रोजी होणार असून, यावेळचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामपंचायत सदस्य मिळून सरपंचांची निवड करणार नाहीत. थेट मतदारच सरपंचांची निवड करणार आहेत. गावकर्यांच्या हातात कारभार्याची दोरी असणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही घोषणा केली. मदान म्हणाले की, जिथे अधिक पाऊस आहे, तिथे या निवडणुका नाहीत. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या राज्यातील 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींतून या निवडणुका होतील. सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 19 सप्टेंबर रोजी होईल. 51 तालुक्यांतील संबंधित गावांतून शुक्रवारपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मतमोजणी 19 सप्टेंबर रोजी होईल.
यवतमाळ : बाभुळगाव 2, कळंब 2, यवतमाळ 3, महागाव 1, आर्णी 4, घाटंजी 6, केळापूर 25, राळेगाव 11, मोरगाव 11 व झरी जामणी 8, नांदेड : माहूर 24, किनवट 47, अर्धापूर 1, मुदखेड 3, नायगाव (खैरगाव) 4, लोहा 5, कंधार 4, मुखेड 5 व देगलूर 1, हिंगोली : (औंढा नागनाथ) 6 , परभणी : जिंतूर 1 व पालम 4 , लातूर : अहमदपूर 1
हेही वाचा