Latest

E-KYC : आधार द्वारे ई-केवायसी व्यवहारात २२ टक्क्यांची वाढ : केंद्र सरकार

अमृता चौगुले
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  देशात 'आधार'चा वापर सातत्याने वाढत असून नोव्हेंबर महिन्यात २८.७५ कोटी ई-केवायसी (E-KYC) व्यवहार 'आधार'च्या सहाय्याने झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. त्याआधी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या व्यवहारांच्या तुलनेत ही वाढ २२% आहे.
नोव्हेंबर २०२२ च्या अखेरीस, ई-केवायसी (E-KYC) व्यवहारांची एकूण संख्या १३५०.२४ कोटी इतकी होती. बँका व बँकेतर आर्थिक सेवांमध्ये 'आधार ई-केवायसी सेवे'मुळे पारदर्शकता आली असून ग्राहकांना येणाऱ्या अनुभवातही सुधारणा झाली आहे, यामुळे व्यवसाय करण्यात सुलभता निर्माण झाल्याचा दावा केंद्राने केला आहे. 'आधार'धारकाने स्पष्ट मान्यता दिल्यानंतरच ई-केवायसी व्यवहार केला जातो. त्यात केवायसी संबंधित कागदोपत्री कामे आणि व्यक्तीच्या प्रत्यक्ष हजेरीची गरज संपुष्टात आली आहे.
नोव्हेंबरमध्ये १९५.३९ कोटी 'आधार' प्रमाणीकरणामार्फत व्यवहार झाले; हे ऑक्टोबरच्या तुलनेत ११ टक्क्यांहून जास्त आहेत. यातील बहुतांश मासिक व्यवहार बोटाच्या ठशाच्या आधारे केल्या जाणाऱ्या बायोमेट्रीक प्रमाणीकरण व त्यानंतर लोकसंख्याधारित विदा व ओटीपी अर्थात 'वन टाईम पासवर्ड'च्या वापराद्वारे करण्यात आले.
ई-केवायसी (E-KYC) सेवेला सुरुवात झाल्यापासून ते नोव्हेंबर २०२२ अखेरपर्यंत एकूण ८६२१.१९ कोटी 'आधार' प्रमाणीकरणामार्फत व्यवहार झाले आहेत, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
.हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT