Latest

भारताने दिला चीन-पाकिस्‍तानला झटका, श्रीनगरमध्‍ये होणार्‍या G-20 बैठकीची तारीख ठरली

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चीन आणि पाकिस्‍तानाकडून सुरु असणार्‍या कांगाव्‍याकडे दुर्लक्ष करत भारताने श्रीनगरमध्‍ये होणार्‍या G-20 बैठकीच्‍या तारीख निश्‍चित केल्‍या आहेत. ही बैठक २२ ते २४ मे दरमान्‍य श्रीनगरमध्‍ये होणार आहे. भारतातील विविध राज्‍यांमध्‍ये टी-२० बैठका होत आहेत. मात्र जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमधील बैठकांवर चीन आणि पाकिस्‍तानने थयथयाट सुरु केला होता. याला आता भारताने चोख प्रत्‍युत्तर दिले आहे.

गेल्या महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या G-20 बैठकीवर चीनने आक्षेप घेत प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली होती. तसेच अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांचे नाव बदलून थयथयाट केला होता. पाकिस्तानने श्रीनगरमधील जी-20 बैठक घेण्‍यात येवू नये यासाठी सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि चीनसारख्या गटातील आपल्या मित्रपक्षांची मदत घेतली होती.

श्रीनगरमध्‍ये होणार्‍या बैठकीची तारीख जाहीर करुन भारताने दिले चोख प्रत्‍युत्तर

भारताने शुक्रवारी श्रीनगरमध्‍ये होणार्‍या G-20 देशांच्या बैठकीबाबत आपली भूमिका स्‍पष्‍ट केली. पर्यटनावरील G-20 कार्यगटाची बैठक २२ ते २४ मे दरम्यान श्रीनगरमध्ये होईल, असे भारताच्‍यावतीने स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. टाईम्‍स ऑफ इंडियाने दिलेल्‍या वृत्तानुसार, G-20 बैठकीची तयारी मागील वर्षीच सुरू झाली होती. देशातील सर्व २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये G-20 बैठका होत आहेत. अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर हे दोन्ही भारताचे अविभाज्य भाग आहेत, त्यामुळे भारताने आता श्रीनगरमधील बैठकीच्‍या तारखा जाहीर करत चीन आणि पाकिस्‍तानला चोख प्रत्‍युत्तर दिले आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT