Latest

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता दिवाळीनंतर सुनावणी

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (दि. २७) सुनावणी झाली. या सुनावणी ५ न्यायमूर्तीच्या घटनापीठाने शिवसेना चिन्हाबाबतच चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात ढकलला. तर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेसह इतर मुद्द्यांवरील सुनावणी आता दिवाळीनंतर १ नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे सत्तासंघर्षावर कोणता निकाल येतो, हे पाहण्यासाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर खरी शिवसेना कोणाची? हा वाद निर्माण झालेला आहे. विधानसभेत शिंदे गटाकडे बहुमत असल्याने शिवसेनेवर या गटाने दावा सांगितलेला आहे. दुसरीकडे मूळ शिवसेना आमचीच असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. तिकडे बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेसह इतर याचिकांवर दिवाळीनंतर म्हणजे १ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होईल.
 खरी सेना कोणाची, हे ठरविण्याची प्रक्रिया सुरू करण्यास घटनापीठाने निवडणूक आयोगाला दिलेली मान्यता म्हणजे ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. घटनापीठाच्या वरील निर्णयामुळे धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटांदरम्यान सुरु असलेली लढाई निवडणूक आयोगात पोहोचली आहे.

दरम्यान, राज्यात शिवसेना पक्षाअंतर्गत वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती एम.आर.शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी.नरसिंहा सदस्‍य असणार्‍या घटनापीठासमाेर मंगळवारी सुनावणी झाली. सुमारे सहा तासांहून अधिक काळ युक्तिवाद झाला. यानंतर  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास घटनापीठाने नकार दिला.  (Maharashtra Politics Crisis)

मंगळवारी सकाळी साडे वाजतापासून घटनापीठापुढे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबात संध्याकाळी ५ वाजतापर्यंत सुनावणी झाले. ठाकरे गटाच्या वतीने ॲड.कपिल सिब्बल, ॲड.अभिषेक मनु सिंघवी, तर शिंदे गटाच्या वतीने  ॲड.महेश जेठमलानी,  ॲड.नीरज कौल, ॲड.मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाजूने  ॲड.तुषार मेहता यांनी तर निवडणूक आयोगाच्या वतीने  ॲड.अरविंद दातार यांनी बाजू मांडली. (Maharashtra Politics Crisis)

आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास घटनापीठाने नकार दिल्याने हा निर्णय शिंदे गटाला दिलासा तर उद्धव ठाकरे गटाला धक्का मानला जात आहे. या निर्णयामुळे शिवसेना पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयाेग काेणता निर्णय घेणार याकडे महाराष्‍ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. आता धनुष्यबाण हे शिवसेनेचे पक्षचिन्ह ठाकरे गटाला मिळणार की शिंदे गटाला ? याबाबातची लढाई आता निवडणूक आयोगात होणार आहे.(Maharashtra Politics Crisis)

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT