गोवा

इथेनॉल प्रकल्प सुरु करा, संजीवनी साखर कारखाना वाचवा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन

निलेश पोतदार

पणजी : प्रभाकर धुरी संजीवनी साखर कारखान्यासमोर आंदोलन करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आज (सोमवार) आपला मोर्चा पणजीतील आझाद मैदानाकडे वळवला आहे. त्यांनी आझाद मैदानावर निदर्शने करुन धरणे धरले आहे. इथेनॉल प्रकल्प सुरु करा आणि संजीवनी साखर कारखाना वाचवा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. या आंदोलनात 200 हून अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुपारपर्यंत दखल न घेतल्यास त्यांच्या निवासस्थानी धडक देण्याचा इशारा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे. आपल्या मागण्या मान्य झाल्याखेरीज आम्ही माघार घेणार नाही असा निर्णय ऊस उत्पादक शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी घेतला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT