पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजीत मार्केटमध्ये टोमॅटो दरात पुन्हा वाढ झाली असून, प्रतिकिलो ८० रु. दराने, तर फलोत्पादनकडे ७५ रु. किलो दराने टोमॅटो विकले जात आहेत. फलोत्पादनकडे टोमॅटोचा दर उतरत आहे. कांद्याचा भाव मात्र स्थिर म्हणजे ४५ रु., बटाट्याचा ४५ रु. आहे, तर मार्केटमध्ये कांदा, बटाटा ५० रु. किलो दराने विकला जात आहे.
गाजराचा दर बाजारात ८० रु. तर फलोत्पादनकडे स्थिर म्हणजे ५५ रु. किलो आहे. फलोत्पादनकडे भेंडी ७० रु., तर बीट ५० रु. किलो झाला आहे. मिरची ५७ रु., आहे. आले १०९ रुपये, तर लसूण १८८ रुपये, कोबी ३१ रु.नग, वालपापडी ६५ रु., चिटकी ५० रु., कारली ७८ रुपये, ढब्बू मिरची ९४ रु. किलो झाली आहे.
काही भाज्यांचे दर कमी झाले, तर काहींचे वाढले आहेत. मार्केटमध्ये भेंडी ८० रु. बीट ८० रु. मिरची ८०-१०० रु. लसूण १२०, २६०,३२० रु. किलो आहे, तर वालपापडी १०० रु. चिटकी ६०-७० रु. कारली ८० ९० रु. ढब्बू मिरची ९०- १०० रु. किलो आहे. कोबी, फ्लॉवर ४० ५० रुपये नग आहे. वाल जुडी २५ ३० रु. मुळा, लाल भाजी ५० ला ३ जुड्या मिळत होत्या.