पणजी : पुढारी वृत्तसेवा
जनगणना २०२७ चा पहिला टप्पा १६ एप्रिलपासून सुरू होत असून यामध्ये घरांची यादी आणि गृहगणना यांचा समावेश आहे. हा टप्पा १५ मे पर्यंत सुरू राहाणार आहेत. स्थिती, या मोहिमेंतर्गत कुटुंबांच्या घरांची आणि सोयीसुविधा मालमत्तेविषयी माहिती गोळा केली जाईल.
त्याआधी १ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत स्वयंगणना सुविधा उपलब्ध असेल. त्यामुळे रहिवाशांना प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यवाही सुरू होण्यापूर्वी डिजिटल पद्धतीने तपशील सादर करता येईल. जनगणना कायदा १९४८ आणि सुधारित जनगणना नियम, १९९० च्या तरतुदींनुसार जनगणना केली जात आहे. आगामी फेरीत डिजिटल पद्धतींचा अवलंब केला जाईल. त्यामुळे कागदपत्रांवर आधारित गणनेच्या पद्धतीत बदल होईल. लोकसंख्या गणनेचा समावेश असलेला दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ मध्ये नियोजित आहे.