Latest

पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार- बसमध्ये भीषण अपघात, ४ ठार

दीपक दि. भांदिगरे

डहाणू : पुढारी वृत्तसेवा; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार आणि बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात ४ जण ठार झाले आहेत. गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या लक्झरी बसवर धडकली. यामुळे कारमधील चारही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पालघर जिल्ह्यातील डहाणू भागात झाला आहे.

या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण गुजरातच्या बारडोली गावात राहणारे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चारही मृतदेह कासा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून कासा पोलीस अधिक तपास करत आहेत.

कासा पोलीस ठाणे हद्दीत आज दि. ३१ रोजी पहाटे ३:१० वाजता सुमारास महामार्ग क्रं. ४८ वर स्कोडा कार क्रं. GJ ५ CM २२२२ वरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ती गुजरात दिशेने जाणाऱ्या लक्झरी AR ०१ P ६७३४ वर समोरासमोर जाऊन धडकली. सदर अपघातात मोटर कारमधील मोहंमद अब्दूल सलाम हाफिसजी (वय ३६ वर्षे, इब्राहिम दाऊद (वय ६०), आसिया बेन कलेक्टर (वय ५७), इस्माईल महंमद देसाय (वय ४२) यांचा (सर्व रा. बार्डोली, जिल्हा सूरत) मृत्यू झाला आहे. लक्झरी बसमधील ३ प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT