दुपारच्या जेवणात आधी काय खावे? पोटदुखी टाळण्यासाठी जाणून घ्या योग्य फॉर्म्युला file photo
फीचर्स

Lunch Habit : दुपारच्या जेवणात आधी काय खावे? पोटदुखी टाळण्यासाठी जाणून घ्या योग्य फॉर्म्युला

तुम्हाला जेवल्यानंतर पोटदुखी, अपचन समस्या जाणवते या पाठिमागे जेवण्याची चुकीची पद्धत असू शकते.

पुढारी वृत्तसेवा

What Should You Eat First During Lunch? Learn the Right Formula to Avoid Stomach Pain

पुढारी ऑनलाईन :

जर तुम्हाला दुपारच्या जेवणानंतर पोटदुखी, अपचन किंवा गॅससारख्या समस्या होत असतील, तर त्यामागे अन्न खाण्याचा चुकीचा क्रम कारणीभूत असू शकतो. चला तर मग, जेवणाचा योग्य क्रम काय असावा हे जाणून घेऊया.

दुपारचे जेवण हे दिवसातील अत्यंत महत्त्वाचे जेवण मानले जाते. कारण ते आपल्या शरीराला ऊर्जा, पोषण आणि मानसिक ताजेपणा देते. पण लंचमध्ये सर्वप्रथम काय खावे, याचा विचार आपण अनेकदा करत नाही.

बहुतेक लोक भूक लागल्यावर थेट जड किंवा तळलेले पदार्थ खातात, ज्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अन्न खाण्याचा योग्य क्रम पाळणे खूप गरजेचे आहे. योग्य क्रमाने जेवल्यास पचन सुधारते, पोषक घटकांचे शोषण चांगले होते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते.

सर्वप्रथम खा भाज्या आणि सॅलड

लंचमध्ये सुरुवात हिरव्या पालेभाज्या आणि सॅलडपासून करावी.

यामध्ये फायबर भरपूर असते, जे पोट भरल्याची जाणीव करून देते आणि पचनक्रिया सुरळीत करते.

सॅलडमुळे गॅस, पोट फुगणे यांसारख्या समस्या कमी होतात.

टमाटर, काकडी, गाजर, कोबी यांचा समावेश करू शकता.

त्यानंतर प्रोटीनयुक्त आहार

सॅलडनंतर प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे योग्य ठरते.

यामध्ये डाळ, पनीर, अंडी, चिकन किंवा मासे यांचा समावेश होतो.

प्रोटीन शरीराच्या ऊतींची दुरुस्ती करते, स्नायू मजबूत करते आणि ऊर्जा देते.

यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते.

आता घ्या कार्बोहायड्रेट

प्रोटीननंतर कार्बोहायड्रेट घ्यावेत, जसे की पोळी, भात, ब्राउन राईस.

हे पदार्थ नंतर खाल्ल्यास ब्लड शुगर अचानक वाढत नाही.

ते शरीराला ऊर्जा देतात आणि दिवसाचा उर्वरित भाग कार्यक्षम बनवतात.

शेवटी खा फळे आणि गोड पदार्थ

जेवणाच्या शेवटी फळे आणि हलकी गोड वस्तू घ्याव्यात.

फळांमधील नैसर्गिक साखर हळूहळू शरीरात जाते, त्यामुळे ऊर्जा स्थिर राहते.

गोड पदार्थ हळूहळू आणि कमी प्रमाणात खाण्याची सवय लावा.

पाणी आणि पेय पदार्थ

जेवणाच्या 20 मिनिटे आधी आणि नंतर पाणी पिणे योग्य ठरते.

जेवताना जास्त पाणी पिल्यास पचनक्रिया मंदावू शकते.

योग्य वेळी पाणी घेतल्यास अन्न पचायला मदत होते आणि शरीर हायड्रेट राहते.

वाचकांसाठी वरील माहिती वैद्यकीय अहवालांवर आधारित देण्यात आलेली आहे. वैयक्तिक आरोग्य समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT