surya gochar august 2026 sun transit singh zodiac signs precautions next 28 days
पुढारी ऑनलाईन : Surya Gochar 2026: १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सूर्यदेव कर्क राशीतून बाहेर पडून सिंह राशीत प्रवेश केला असून, १७ सप्टेंबरपर्यंत ते याच राशीत राहणार आहेत. त्यामुळे सिंह राशीत सूर्य आणि केतूची अशुभ युती निर्माण झाली आहे. चला जाणून घेऊया, कोणत्या राशींनी या काळात सावध राहण्याची गरज आहे.
ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवांना आत्मा, पिता, मान-सन्मान आणि नेतृत्वाचा कारक मानले जाते. तर केतू हा छाया ग्रह असून तो भ्रम आणि मानसिक तणावाचे प्रतीक मानला जातो. द्रिक पंचांगानुसार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी सूर्यदेवांनी स्वतःच्या सिंह राशीत प्रवेश केला आहे. या राशीत मायावी ग्रह केतू आधीपासूनच विराजमान आहे.
सिंह राशीत सूर्य आणि केतूची ही युती सूर्य-केतू ग्रहण योग तयार करत आहे. ज्योतिषीय दृष्टिकोनातून जेव्हा सूर्यावर केतूची छाया पडते, तेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो, कामाच्या ठिकाणी अडथळे निर्माण होऊ शकतात आणि वडील तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतचे संबंध प्रभावित होऊ शकतात. या अशुभ युतीचा विशेष परिणाम ४ राशींवर होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया, या काळात कोणत्या राशींनी जपून राहावे.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. सूर्याचा हा गोचर वृश्चिक राशीच्या दशम भावात प्रभाव निर्माण करू शकतो. त्यामुळे कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी किंवा बॉससोबत वाद घालणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते. कोणताही मोठा निर्णय घाईने किंवा रागाच्या भरात घेऊ नका. नवीन प्रकल्पात मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाबींची नीट तपासणी करा. या काळात पैसे अडकण्याची शक्यता आहे.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या जातकांसाठी सूर्याचा हा गोचर अष्टम भावात म्हणजेच संकट आणि अचानक बदलांच्या भावात प्रभावी राहील. वाहन चालवताना किंवा प्रवासादरम्यान विशेष काळजी घ्या. कोर्ट-कचेरी किंवा सरकारी कागदपत्रांशी संबंधित कामात निष्काळजीपणा करू नका. अचानक होणाऱ्या खर्चामुळे बजेट बिघडू शकते. या काळात कोणालाही पैसे उधार देणे टाळा.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या जातकांसाठी सूर्याचा हा गोचर सप्तम भावावर म्हणजेच भागीदारी आणि वैवाहिक जीवनावर प्रभाव टाकेल. जीवनसाथीसोबत मतभेद किंवा अहंकारामुळे तणाव वाढू शकतो. व्यवसायातील भागीदारीत कोणत्याही प्रकारचे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. जीवनसाथीच्या किंवा स्वतःच्या आरोग्यावर अचानक परिणाम होऊ शकतो. विशेषतः पोट आणि हाडांशी संबंधित समस्यांकडे लक्ष द्या.
नकारात्मक प्रभावांपासून बचाव करण्यासाठी ज्योतिषीय उपाय
दररोज सकाळी तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात चिमूटभर रोळी मिसळा आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्या.
केतूच्या अशुभ प्रभावापासून बचाव करण्यासाठी कुत्र्यांना पोळी किंवा बिस्किटे खाऊ घाला.
रविवारी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा आणि गहू किंवा गूळ दान करा.
वरील सर्व माहिती ज्योतिष शास्त्रावर आणि श्रद्धेवर आधारित आहे. वाचकांनी अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा..